🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔬
**************************
*पृथ्वीची निर्मिती (८)*
_________________________
गॅलिलिओला रोमच्या धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याचा पुन्हा एकवार हुकूम सुटला. आजारपणामुळे फलारेन्झापासून रोमपर्यंतचा प्रवास झेपणार नाही ही गॅलिलिओची नम्र विनंती नाकारण्यात आली. मित्र असलेल्या पोपने आरोपीची प्रकृती तपासण्याकरता स्वतःचा वैद्य पाठविण्याची व त्याचा आजार बळावला असल्याचे सिद्ध न झाल्यास त्याला साखळदंडांने जेरबंद करून आणण्याची धमकी दिली. गॅलिलिओ स्वतःच रोमला पोहोचला. तेथे न्यायसभेच्या बंदीशाळेत त्याची रवानगी करण्यात आली. खरे तर देहांत प्रायश्चित्त मिळावयाचे; पण दयाळूपणा सुनावण्यात आले, 'तू चुका कबूल केल्यास आणि पश्चाताप पावल्यास तुला आमच्या मर्जीस येईल तोपर्यंत पवित्र न्यायसभेच्या तुरुंगात दिवस काढण्याची सौम्य शिक्षा फर्मावण्यात येईल आणि एक हितकारक देहदंड म्हणून पुढील तीन वर्षे धर्मग्रंथांतील सात पश्चात्तापनिदर्शक प्रार्थना दर आठवड्यास पठण करण्याची आज्ञा देण्यात येईल.'
चुका कबूल केल्या तरच ही सौम्य शिक्षा अमलात येणार असल्याने गॅलिलिओने जमिनीवर गुडघे टेकून न्यायसभेने तयार केलेली लांबलचक जंत्री जाहीर रित्या म्हणून दाखवली आणि म्हणाला, "मी या चुकांचा व पाखंडी मतांचा त्याग करतो, ती तिरस्करणीय मानतो आणि अशी शपथ घेतो की, मी यानंतर माझ्याविषयी शंका निर्माण होईल असे काहीही लेखन करणार नाही वा वक्तव्य करणार नाही अथवा ठामपणे मांडणार नाही. पृथ्वी फिरते आहे या मताचा पुरस्कार करणारा कोणी पाखंडी भेटल्यास मी त्याचा न्यायसभेसमोर निषेध करीन." स्वतःच्या विचारांचा त्याग केल्याची शपथ बायबलवर हात ठेवून त्याने घेतली. नंतर उदार न्यायसभेने त्याला उरलेले आयुष्य तुरुंगात न काढता एकांतवासात व मौनव्रतात काढण्याची परवानगी दिली. गॅलिलिओच्या सर्व हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. त्याची त्याच्या कुटुंबीयांशी व मित्रांची भेट होऊ दिली नाही. तो १६३७ साली आंधळा झाला आणि १६४२ साली मरण पावला.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की गॅलिलियो ने असा गंभीर गुन्हा तरी कोणता केला होता ? जी गोष्ट आज प्राथमिक शाळेतील पोराला शिकवली जाते आणि निश्चित स्वरूपात माहित असते, अशी बाब सप्रयोग सिद्ध करूनही बिनशर्त माफी मागण्याची वेळ गॅलेलीओवर का आली ? ती आली याचे कारणे गॅलिलिओ हा या विश्वातील एका रचनेचा वेगळा कार्यकारणभाव लोकांना स्पष्ट करून सांगत होता. सूर्य चंद्राच्या अस्तित्वाचा, ते प्रकाशण्याचा आणि मावळण्याचा बायबल मधला कार्यकारणभाव होता, आकाशातील बाप्पाची म्हणजे परमेश्वराची इच्छा. गॅलीलिओ सांगत होता अगदीच वेगळा कार्यकारणभाव. संपूर्ण विश्व कसे चालते याबाबतच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू कोपर्निकसने बदलला, गॅलेलियोने त्यावर मोहर उठवली आणि जगाचा अर्थ लावण्याची एक नवीन रीत मानवी इतिहासात सिद्ध झाली. ती रीत अशी-
*१) प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच.*
*२) ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.*
*३) सर्वच गोष्टींची कारणे समजतात असे नाही; परंतु ज्यावेळी समजतील त्या वेळी कशा प्रकारे समजतील ते नक्की समजते.*
*४) यथार्थ ज्ञानप्राप्तीचा आज तरी माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे.*
यामुळे जगाकडे बघण्याची एक आरपार वेगळी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.
*क्रमश:*
*तिमिरातून तेजाकडे* या पुस्तकातुन
**************************
*पृथ्वीची निर्मिती (८)*
_________________________
गॅलिलिओला रोमच्या धार्मिक न्यायसभेसमोर हजर राहण्याचा पुन्हा एकवार हुकूम सुटला. आजारपणामुळे फलारेन्झापासून रोमपर्यंतचा प्रवास झेपणार नाही ही गॅलिलिओची नम्र विनंती नाकारण्यात आली. मित्र असलेल्या पोपने आरोपीची प्रकृती तपासण्याकरता स्वतःचा वैद्य पाठविण्याची व त्याचा आजार बळावला असल्याचे सिद्ध न झाल्यास त्याला साखळदंडांने जेरबंद करून आणण्याची धमकी दिली. गॅलिलिओ स्वतःच रोमला पोहोचला. तेथे न्यायसभेच्या बंदीशाळेत त्याची रवानगी करण्यात आली. खरे तर देहांत प्रायश्चित्त मिळावयाचे; पण दयाळूपणा सुनावण्यात आले, 'तू चुका कबूल केल्यास आणि पश्चाताप पावल्यास तुला आमच्या मर्जीस येईल तोपर्यंत पवित्र न्यायसभेच्या तुरुंगात दिवस काढण्याची सौम्य शिक्षा फर्मावण्यात येईल आणि एक हितकारक देहदंड म्हणून पुढील तीन वर्षे धर्मग्रंथांतील सात पश्चात्तापनिदर्शक प्रार्थना दर आठवड्यास पठण करण्याची आज्ञा देण्यात येईल.'
चुका कबूल केल्या तरच ही सौम्य शिक्षा अमलात येणार असल्याने गॅलिलिओने जमिनीवर गुडघे टेकून न्यायसभेने तयार केलेली लांबलचक जंत्री जाहीर रित्या म्हणून दाखवली आणि म्हणाला, "मी या चुकांचा व पाखंडी मतांचा त्याग करतो, ती तिरस्करणीय मानतो आणि अशी शपथ घेतो की, मी यानंतर माझ्याविषयी शंका निर्माण होईल असे काहीही लेखन करणार नाही वा वक्तव्य करणार नाही अथवा ठामपणे मांडणार नाही. पृथ्वी फिरते आहे या मताचा पुरस्कार करणारा कोणी पाखंडी भेटल्यास मी त्याचा न्यायसभेसमोर निषेध करीन." स्वतःच्या विचारांचा त्याग केल्याची शपथ बायबलवर हात ठेवून त्याने घेतली. नंतर उदार न्यायसभेने त्याला उरलेले आयुष्य तुरुंगात न काढता एकांतवासात व मौनव्रतात काढण्याची परवानगी दिली. गॅलिलिओच्या सर्व हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. त्याची त्याच्या कुटुंबीयांशी व मित्रांची भेट होऊ दिली नाही. तो १६३७ साली आंधळा झाला आणि १६४२ साली मरण पावला.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की गॅलिलियो ने असा गंभीर गुन्हा तरी कोणता केला होता ? जी गोष्ट आज प्राथमिक शाळेतील पोराला शिकवली जाते आणि निश्चित स्वरूपात माहित असते, अशी बाब सप्रयोग सिद्ध करूनही बिनशर्त माफी मागण्याची वेळ गॅलेलीओवर का आली ? ती आली याचे कारणे गॅलिलिओ हा या विश्वातील एका रचनेचा वेगळा कार्यकारणभाव लोकांना स्पष्ट करून सांगत होता. सूर्य चंद्राच्या अस्तित्वाचा, ते प्रकाशण्याचा आणि मावळण्याचा बायबल मधला कार्यकारणभाव होता, आकाशातील बाप्पाची म्हणजे परमेश्वराची इच्छा. गॅलीलिओ सांगत होता अगदीच वेगळा कार्यकारणभाव. संपूर्ण विश्व कसे चालते याबाबतच्या शिकवणुकीचा केंद्रबिंदू कोपर्निकसने बदलला, गॅलेलियोने त्यावर मोहर उठवली आणि जगाचा अर्थ लावण्याची एक नवीन रीत मानवी इतिहासात सिद्ध झाली. ती रीत अशी-
*१) प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच.*
*२) ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.*
*३) सर्वच गोष्टींची कारणे समजतात असे नाही; परंतु ज्यावेळी समजतील त्या वेळी कशा प्रकारे समजतील ते नक्की समजते.*
*४) यथार्थ ज्ञानप्राप्तीचा आज तरी माणसाला लाभलेला हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे.*
यामुळे जगाकडे बघण्याची एक आरपार वेगळी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.
*क्रमश:*
*तिमिरातून तेजाकडे* या पुस्तकातुन
No comments:
Post a Comment