🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*२१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन*(२)
_________________________________
वैज्ञानिक दृष्टिकोनाने ही परिस्थिती बदलता यावयास हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजजीवनाचे मार्ग देखील ठरवतो हे समजून घेणे अगत्याचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असे की तो आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या समाजातील अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वतेअभावी निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने सामान्य माणसाच्या जीवनात जर आकलनाची परिपक्वता वाढवता आली तर स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय लोकशाहीत अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. २०२० साली भारत महासत्ता होणार, असे सांगितले जाते. मात्र बहुतेकांना या महासत्तेचे रूप असे वाटते, की भारताचा अवकाशयात्री चंद्रावर पोहोचलेला असेल, शास्त्रीयदृष्ट्या विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात भारत जगात पहिल्या दोन चार राष्ट्रात असेल. तो सर्वांगाने शस्त्रसज्ज असेल. आता दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित करावयास हवा की विकास निर्देशांकात जगात भारताचा नंबर १२७ वा आहे. हा निर्देशांक साक्षरता, गरोदरपणातील मृत्यू, नवजात अर्भकांचे मृत्यू, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय इत्यादींच्या आधारे काढला जातो. या दोन्ही बाबींची तुलना आकलनाच्या परिपक्वतेने केली; तर स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की चंद्रावर पाऊल ठेवण्याएवढे प्रगत तंत्रज्ञान भारताकडे आहे, मग देशातील आया बहिणी गरोदरपणात मरू नयेत आणि त्यांना नळाने घरी पाणी मिळावे ही अत्यंत साधी बाब या देशात अजूनही इतकी अवघड का ? प्रश्नाचे हे आकलन, प्राधान्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने जर सामान्यांच्या मनात तयार झाले, तर देशापुढे विकासाचे प्राधान्यक्रम बदलतात. अनेक सामाजिक प्रश्नांचे असे भान विसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांच्यात निर्माण करू शकेल, नव्हे त्याने ते करावे अशी अपेक्षा आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करण्यास मदत करतो आणि ती सदैव मुक्तच राहावी यासाठी आधार पुरवतो. माणूस असणे याचा अर्थच जाणीव असणे आणि खरे तर मुक्त जाणीव असणे. ही जाणीव एका बाजूला सामाजिक व्यवस्था ठरवीत असते, परंतु या भौतिक परिस्थितीच्या दबावाखालीही व्यक्ती स्वतःची जाणीव मुक्त करू शकते. हे फक्त माणसाचेच वैशिष्टय़ आहे. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी *गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो बंड करून उठेल.* असे सांगितले आणि राजकीय क्रांतीआधी व वैचारिक क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली. राजकीय दडपशाही, आर्थिक पिळवणूक, अनेकविध कारणांनी निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी या सर्वांतून मुक्त होण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाबरोबरच एक मुक्त जाणीव लागते, जी कोणत्याही दबावाखाली येत नाही. ती जाणीव निर्माण करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाची कामगिरी बजावतो. म्हणजेच माणसाला सर्वात मौल्यवान असलेल्या जाणिवेच्या स्वातंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा आहे.
या स्वतंत्र जाणिवांचाच एक भाग म्हणजे मन वासनाविकारांपासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करुणा या जाणिवांच्या परिपोषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा शोध लागण्या आधीच्या शेकडो हजारो वर्षांपासून माणसाचा हा शोध चालू आहे. ज्यांना आपण सत्पुरुष, संत अथवा महामानव म्हणतो. त्यांनी आपापल्या परीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीर्घ वाटचालीत धर्मांनी अथवा पंथांनी त्या मार्गाला आत्मसात करून त्यावर आपली मोहर उठवली. असे अनेक मार्ग आज सांगितले जातात मात्र त्यांची परिणामकारकता ही बऱ्याच प्रमाणात प्रश्नचिन्हांकित आहे. तसेच हा मार्ग चोखाळणारे बहुतेक जण व्यवस्था परिवर्तनाबाबत ब्र उच्चारत नाहीत. काही हजार वर्षे चालू असलेला हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने आधुनिक मानसशास्त्रज्ञ व मनोविज्ञानशास्त्र एकविसाव्या शतकात घेतील अशी अपेक्षा आहे. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल ही या अर्थाने मानवमुक्तीची वाटचाल ठरू शकेल.
*क्रमशः*
*तिमिरातूनी तेजाकडे या पुस्तकातून*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*२१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन*(२)
_________________________________
वैज्ञानिक दृष्टिकोनाने ही परिस्थिती बदलता यावयास हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजजीवनाचे मार्ग देखील ठरवतो हे समजून घेणे अगत्याचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असे की तो आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या समाजातील अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वतेअभावी निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या साहाय्याने सामान्य माणसाच्या जीवनात जर आकलनाची परिपक्वता वाढवता आली तर स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय लोकशाहीत अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. २०२० साली भारत महासत्ता होणार, असे सांगितले जाते. मात्र बहुतेकांना या महासत्तेचे रूप असे वाटते, की भारताचा अवकाशयात्री चंद्रावर पोहोचलेला असेल, शास्त्रीयदृष्ट्या विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात भारत जगात पहिल्या दोन चार राष्ट्रात असेल. तो सर्वांगाने शस्त्रसज्ज असेल. आता दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित करावयास हवा की विकास निर्देशांकात जगात भारताचा नंबर १२७ वा आहे. हा निर्देशांक साक्षरता, गरोदरपणातील मृत्यू, नवजात अर्भकांचे मृत्यू, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय इत्यादींच्या आधारे काढला जातो. या दोन्ही बाबींची तुलना आकलनाच्या परिपक्वतेने केली; तर स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की चंद्रावर पाऊल ठेवण्याएवढे प्रगत तंत्रज्ञान भारताकडे आहे, मग देशातील आया बहिणी गरोदरपणात मरू नयेत आणि त्यांना नळाने घरी पाणी मिळावे ही अत्यंत साधी बाब या देशात अजूनही इतकी अवघड का ? प्रश्नाचे हे आकलन, प्राधान्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने जर सामान्यांच्या मनात तयार झाले, तर देशापुढे विकासाचे प्राधान्यक्रम बदलतात. अनेक सामाजिक प्रश्नांचे असे भान विसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांच्यात निर्माण करू शकेल, नव्हे त्याने ते करावे अशी अपेक्षा आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करण्यास मदत करतो आणि ती सदैव मुक्तच राहावी यासाठी आधार पुरवतो. माणूस असणे याचा अर्थच जाणीव असणे आणि खरे तर मुक्त जाणीव असणे. ही जाणीव एका बाजूला सामाजिक व्यवस्था ठरवीत असते, परंतु या भौतिक परिस्थितीच्या दबावाखालीही व्यक्ती स्वतःची जाणीव मुक्त करू शकते. हे फक्त माणसाचेच वैशिष्टय़ आहे. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी *गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो बंड करून उठेल.* असे सांगितले आणि राजकीय क्रांतीआधी व वैचारिक क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली. राजकीय दडपशाही, आर्थिक पिळवणूक, अनेकविध कारणांनी निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी या सर्वांतून मुक्त होण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाबरोबरच एक मुक्त जाणीव लागते, जी कोणत्याही दबावाखाली येत नाही. ती जाणीव निर्माण करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाची कामगिरी बजावतो. म्हणजेच माणसाला सर्वात मौल्यवान असलेल्या जाणिवेच्या स्वातंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा आहे.
या स्वतंत्र जाणिवांचाच एक भाग म्हणजे मन वासनाविकारांपासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करुणा या जाणिवांच्या परिपोषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक दृष्टीकोणाचा शोध लागण्या आधीच्या शेकडो हजारो वर्षांपासून माणसाचा हा शोध चालू आहे. ज्यांना आपण सत्पुरुष, संत अथवा महामानव म्हणतो. त्यांनी आपापल्या परीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीर्घ वाटचालीत धर्मांनी अथवा पंथांनी त्या मार्गाला आत्मसात करून त्यावर आपली मोहर उठवली. असे अनेक मार्ग आज सांगितले जातात मात्र त्यांची परिणामकारकता ही बऱ्याच प्रमाणात प्रश्नचिन्हांकित आहे. तसेच हा मार्ग चोखाळणारे बहुतेक जण व्यवस्था परिवर्तनाबाबत ब्र उच्चारत नाहीत. काही हजार वर्षे चालू असलेला हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने आधुनिक मानसशास्त्रज्ञ व मनोविज्ञानशास्त्र एकविसाव्या शतकात घेतील अशी अपेक्षा आहे. एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल ही या अर्थाने मानवमुक्तीची वाटचाल ठरू शकेल.
*क्रमशः*
*तिमिरातूनी तेजाकडे या पुस्तकातून*
No comments:
Post a Comment