🌎 *पृथ्वीवर सजीवसृष्टी केव्हा अवतरली ?* 🌎
***********************************
जेम्स अश्शर या आयरिश धर्मगुरूने बायबलचा हवाला देत असा दावा केला होता की हे सारं जग त्यातल्या सजिवांच्या तसंच निर्जीवांच्या वैविध्यासह इसवी सनापूर्वीच्या ४००४ या वर्षी २६ ऑक्टोबरपासूनच्या सहा दिवसांत अस्तित्वात आलं. पण पृथ्वीवरच्या अनेक खडकांचंच वय किमान साडेतीन अब्ज वर्ष असल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच निरनिराळ्या उत्खननातून सापडलेल्या अनेक जीवाश्मांचं वयही कोट्यवधी वर्ष असल्याचा निर्णायक पुरावा मिळालेला आहे. तेव्हा आपलं जग किंवा आपली सजीवसृष्टी ही केवळ सहा हजार वर्षांपूर्वीच अवतरली हा दावा पोकळ ठरतो.
जगाच्या किंवा सजीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीचे असे सिद्धांत जवळजवळ प्रत्येक धर्माच्या धुरीणांकडून मांडले गेले आहेत. त्यापाठी निसर्गाच्या अनेक गुढांसंबंधीचं त्या त्या वेळचं तुटपुंजं ज्ञान कारणीभूत होतं यात शंका नाही. शिवाय सजीवसृष्टीचा विचार करताना आपण आज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सजीवसृष्टीला प्रमाण मानून आपले आडाखे बांधत असतो. पण मानवप्राण्यापेक्षा इतर अनेक प्राणी कितीतरी आधी उदयाला आले आहेत. वनस्पती तर त्याहूनही पुरातन आहेत. शिवाय या वन्य वनस्पती किंवा प्राणी यांचे कित्येक पूर्वसुरी आता नष्टही झाले आहेत. डायनासोर या धरतीवर तब्बल साडेसोळा कोटी वर्षांचा अंमल गाजवून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी विनाश पावले. सर्वात प्राथमिक अवस्थेतले सजीव म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव. त्यांचं अस्तित्व तर कितीतरी पुरातन आहे.
तेव्हा सजीवसृष्टीच्या उदयाचा विचार करताना आपल्याला या प्राथमिक स्वरूपाच्या सजीवांकडे लक्ष वळवायला हवं. थोडक्यात ज्यांच्या ठायी स्वतःचं पुनरुत्पादन स्वतःच्याच बळावर करण्याची क्षमता आहे अशा काही सेंद्रिय रेणूंचा विचार करायला हवा. या दृष्टीने नोबेल पोलिस पुरस्कारविजेते हॅरॉल्ड युरे आणि त्यांचा विद्यार्थी स्टॅनले मिलर यांनी केलेल्या एका क्रांतिकारी आणि विलक्षण प्रयोगाकडे लक्ष द्यायला हवं. पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्या वातावरणात ऑक्सिजनचा संपूर्ण अभाव होता.
तेव्हा मिलर यानं त्या वेळच्या मिथेन, कार्बन डाय अाॅक्साईड, वाफ वगैरेंचं मिश्रण असलेल्या वातावरणाचं एक प्रारूप प्रयोगशाळेत तयार केलं. तसंच त्या वेळी धरतीवर असणाऱ्या उबदार सागरांचं, सतत कोसळणाऱ्या वादळी पावसाचं आणि कडाडणाऱ्या विजांचंही प्रारूप बनवलं. त्या उबदार सागरांमध्ये त्यांनी काही असेंद्रिय रसायनांचं मिश्रणही ठेवलं. आदिधरतीच्या त्या अवस्थेत ती प्रयोगशाळा आठ दिवस राहिल्यानंतर मिलर यांनी शांतता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांना निर्जीव अशा असेंद्रिय रसायनांपासून सजीवांचा कळीचा गाभा असलेल्या सेंद्रिय रसायनांची व खासकरून प्रथिनांचे घटक असणाऱ्या काही अमिनो आम्लांची निर्मिती झाल्याचं दिसून आलं. त्याचा मागोवा घेऊन त्यांनी धरतीवरची सजीवसृष्टी तशाच प्रकार साधारण ३.६ अब्ज वर्षांपूर्वी अवतरली असं अनुमान काढलं. त्याला नंतरच्या अनेक वैज्ञानिक प्रयोगांमधून तसंच सर्वेक्षणांमधून बळकटी मिळालेली आहे.
*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*
***********************************
जेम्स अश्शर या आयरिश धर्मगुरूने बायबलचा हवाला देत असा दावा केला होता की हे सारं जग त्यातल्या सजिवांच्या तसंच निर्जीवांच्या वैविध्यासह इसवी सनापूर्वीच्या ४००४ या वर्षी २६ ऑक्टोबरपासूनच्या सहा दिवसांत अस्तित्वात आलं. पण पृथ्वीवरच्या अनेक खडकांचंच वय किमान साडेतीन अब्ज वर्ष असल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच निरनिराळ्या उत्खननातून सापडलेल्या अनेक जीवाश्मांचं वयही कोट्यवधी वर्ष असल्याचा निर्णायक पुरावा मिळालेला आहे. तेव्हा आपलं जग किंवा आपली सजीवसृष्टी ही केवळ सहा हजार वर्षांपूर्वीच अवतरली हा दावा पोकळ ठरतो.
जगाच्या किंवा सजीवसृष्टीच्या उत्पत्तीसंबंधीचे असे सिद्धांत जवळजवळ प्रत्येक धर्माच्या धुरीणांकडून मांडले गेले आहेत. त्यापाठी निसर्गाच्या अनेक गुढांसंबंधीचं त्या त्या वेळचं तुटपुंजं ज्ञान कारणीभूत होतं यात शंका नाही. शिवाय सजीवसृष्टीचा विचार करताना आपण आज आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या सजीवसृष्टीला प्रमाण मानून आपले आडाखे बांधत असतो. पण मानवप्राण्यापेक्षा इतर अनेक प्राणी कितीतरी आधी उदयाला आले आहेत. वनस्पती तर त्याहूनही पुरातन आहेत. शिवाय या वन्य वनस्पती किंवा प्राणी यांचे कित्येक पूर्वसुरी आता नष्टही झाले आहेत. डायनासोर या धरतीवर तब्बल साडेसोळा कोटी वर्षांचा अंमल गाजवून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी विनाश पावले. सर्वात प्राथमिक अवस्थेतले सजीव म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव. त्यांचं अस्तित्व तर कितीतरी पुरातन आहे.
तेव्हा सजीवसृष्टीच्या उदयाचा विचार करताना आपल्याला या प्राथमिक स्वरूपाच्या सजीवांकडे लक्ष वळवायला हवं. थोडक्यात ज्यांच्या ठायी स्वतःचं पुनरुत्पादन स्वतःच्याच बळावर करण्याची क्षमता आहे अशा काही सेंद्रिय रेणूंचा विचार करायला हवा. या दृष्टीने नोबेल पोलिस पुरस्कारविजेते हॅरॉल्ड युरे आणि त्यांचा विद्यार्थी स्टॅनले मिलर यांनी केलेल्या एका क्रांतिकारी आणि विलक्षण प्रयोगाकडे लक्ष द्यायला हवं. पृथ्वी जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्या वातावरणात ऑक्सिजनचा संपूर्ण अभाव होता.
तेव्हा मिलर यानं त्या वेळच्या मिथेन, कार्बन डाय अाॅक्साईड, वाफ वगैरेंचं मिश्रण असलेल्या वातावरणाचं एक प्रारूप प्रयोगशाळेत तयार केलं. तसंच त्या वेळी धरतीवर असणाऱ्या उबदार सागरांचं, सतत कोसळणाऱ्या वादळी पावसाचं आणि कडाडणाऱ्या विजांचंही प्रारूप बनवलं. त्या उबदार सागरांमध्ये त्यांनी काही असेंद्रिय रसायनांचं मिश्रणही ठेवलं. आदिधरतीच्या त्या अवस्थेत ती प्रयोगशाळा आठ दिवस राहिल्यानंतर मिलर यांनी शांतता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांना निर्जीव अशा असेंद्रिय रसायनांपासून सजीवांचा कळीचा गाभा असलेल्या सेंद्रिय रसायनांची व खासकरून प्रथिनांचे घटक असणाऱ्या काही अमिनो आम्लांची निर्मिती झाल्याचं दिसून आलं. त्याचा मागोवा घेऊन त्यांनी धरतीवरची सजीवसृष्टी तशाच प्रकार साधारण ३.६ अब्ज वर्षांपूर्वी अवतरली असं अनुमान काढलं. त्याला नंतरच्या अनेक वैज्ञानिक प्रयोगांमधून तसंच सर्वेक्षणांमधून बळकटी मिळालेली आहे.
*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*